(भुजंगप्रयात )
मनाला कवीते किती हाय त्रागा...
तुला पाहिजे का लगागा लगागा ?
कधी ओळ येते खयालात थोडी
कधी आशयाचा सुटे एक धागा...
दिले हाय आशीष की शाप आहे ?
कवी नेमका या विचारात जागा
तसा मूळचा खूप दिलदार आहे,
मला पाहिजे तेवढे शब्द मागा ...
छुपे सर्व मी जाणतो बेत आता
कितीही गड्यांनो इशार्यात वागा
कधी लावले एकही रोप नाही
म्हणे, "सर्वजागी फुलाव्यात बागा "
- श्रीकांत चवरे
नाशिक / अकोला
No comments:
Post a Comment